Sunday, May 24, 2020

रतन टाटा यांना भारतरत्न दिले पाहिजे का?

रतन टाटा यांना भारतरत्न दिले पाहिजे का?  हा प्रश्न सध्या समाज माध्यमांमध्ये फार जोमाने चर्चेत आहे.


पण ते आधीपासूनच भारतरत्न आहेत. खोटं वाटतंय? थांबा सिद्धच करुन दाखवतो.


पिंपरी चिंचवड महानगरपालिका

वर दिलेल्या लिंकवर जा. तिथे तुम्हाला मिळकत कर थकबाकीदार यादी असा एक पर्याय दिसेल.


या पर्यायावर क्लिक केले असता पिंपरी चिंचवड महानगरपालिका - 411 018 कर आकारणी व कर संकलन विभाग यांनी प्रसिद्ध केलेली रक्कम रुपये 1,00,000/- पुढील थकबाकी असलेल्या मिळकतधारकांची यादी दिसेल.

https://www.pcmcindia.gov.in/admin/cms_upload/submission/4431611501582214951.pdf (https://www.pcmcindia.gov.in/admin/cms_upload/submission/4431611501582214951.pdf)

या यादीमध्ये प्रथम स्थानी आहेत -

मे.टाटा मोटर्स लिमिटेड पिंपरी पुणे 411018, रुपये - 710056729 (एक्काहत्तर कोटी छप्पन्न हजार सातशे एकोणतीस फक्त)

द्वितीय स्थानावर आहेत -

मे.टाटा लोकोमोटिव्ह अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग कंपनी पॅसेजर कार युनिट कुदळवाडी, रुपये - 173286584 (सतरा कोटी बत्तीस लाख शहाऐंशी हजार पाचशे चौर्‍याऐंशी फक्त)

तृतीय स्थान पटकावले आहे - टाटा इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड लोकोमोटिव्ह चिंचवड रुपये - 160971131 (सोळा कोटी नऊ लाख एक्काहत्तर हजार एकशे एकतीस फक्त)

या यादीसोबतच महापालिकेने सूचना लिहिली आहे की, थकबाकीदार मिळकतधारकांनी लवकरात लवकर मिळकत कराची रक्कम भरणा करावी, अन्यथा मिळकत जप्तीची कारवाई करणेत येईल.

प्रत्यक्षात एखाद्या सामान्य नागरिकाने मिळकत कर थकविला तर त्याची मालमत्ता जप्त देखील होते. पण टाटा समूहाच्या वर नमूद केलेल्या तीन आस्थापनांनी गेल्या कित्येक वर्षांत मिळून १०१ कोटींचा मिळकत कर थकविला आहे आणि याशिवाय टाटा इंडिकॉम, टाटा टेलिसर्विसेस, टाटा टेलिकम्युनिकेशन्स या नावांनी नोंदणी असलेल्या शेकडो आस्थापनांनी कोट्यावधी रुपयांचा मिळकत कर थकविला असूनही पिंपरी महानगरपालिकेकडून त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाहीये.


म्हणजेच रतन टाटा हे साधेसुधे भारतीय नागरिक नसून भारतरत्न असल्याचेच सिद्ध होत नाही का?  

Thursday, June 12, 2014

Reliance Life Insurance Scandal

Details of the fraudulent activities done by Mr. Rahul Jain and Mr. Gaurav Chauhan with me regarding Reliance Life Insurance Guaranteed Money Back Plan.
  • On 22.06.2013, I received a call from Mr. Rahul Jain (Mobile No.8459430046) regarding Reliance Life Insurance Policy.  He also sent me an electronic mail from rahuljain.reliance@gmail.com on my electronic mail address chetangugale@gmail.com with which he attached the scanned copies of the Reliance Life Insurance Guaranteed Money Back Plan form and  asked me to send
    • ID Proof,
    • Address Proof,
    • 2 Photo,
    • a cheque in favour to Reliance Life Insurance Co. Ltd and a
o    cancelled cheque for E.C.S.
and courier these documents along with the filled in form to Reliance Login Department U-203, 3rd Floor, Vikas marg, Shakarpur, Delhi -92
·         On 25.06.2013 he sent another electronic mail stating additional Benefit on directly dealing with the company 20% commission every year and 0.5gm Gold Coin.
  • I therefore, accordingly sent him
o    photocopies of all the required documents
§  Aadhar Card (No.349534854515)
§  PAN Card (No. AAYPG3266C)
o    Cheque No.285966 (State Bank Of India Account No.32557054331) Dt. 24.06.2013 in favour of RELIANCE LIFE INSURANCE COMPANY LIMITED for Rs.30,000/- (Rupees Thirty Thousand Only)
o    Cancelled Cheque No. 285963 (State Bank Of India Account No.32557054331) for ECS purpose.
o    Two photographs
o    Completely filled in form No.D6471599 of Reliance Life Insurance Guaranteed Money Back Plan.
  • On 09.07.2013, Mr. Rahul Jain sent me an electronic mail with which he attached a receipt No.WC0019988473 DT.28.06.2013 of Rs.30,000/- premium paid towards the reliance life insurance policy. 
  • In the next week I received a booklet by speed post scanned copies of the documents I submitted and filled in form.  However, the filled in form which I submitted and the scanned copies of which I received were different.  The form I submitted was having No.D6471599 and the scanned copies I received were having No.D5694601.  On this form my mobile number was also wrongly written as 08506958767 instead of 9552077615, which is the correct one.
  • I immediately called Mr. Rahul Jain, and informed him about this difference.  He replied that as the form I sent was not clearly visible so he filled another form with different mobile number which he claimed was a mistake.  He also stated that these documents are temporary and I shall get Permanent Stamped documents within a few days.
  • However, I did not get any stamped permanent documents.   Therefore, I continuously reminded Mr. Rahul Jain by electronic mail about this on 28.07.2013, 09.09.2013 and 16.09.2013.  I also tried to contact him on his mobile phone. However, I did not get any response from him.
  • Therefore, I had written an electronic mail to rlife.customerservice@relianceada.com and stated all the facts in it on 24.09.2013.  I also asked them for additional Benefit on directly dealing with the company 20% commission every year and 0.5gm Gold Coin committed by Mr. Rahul Jain.
  • Then on 25.09.2013, I got the reply from them as given below: 
    “We would like to inform you that we have multiple sales partners, and their offices are spread across various parts of the country. We are currently having it investigated and would initiate appropriate action. Please be ensured that such an instance will not be repeated in future. There are no such schemes from Reliance Life Insurance Company Ltd as quoted by the said agent. Hence, we kindly request you to ignore such fake calls and commitments.”
  • I also called Customer-care centre on toll free number - 1800-3000-8181 for further clarification.  They told me the documents which I received are the permanent documents only and no further stamped documents will be sent to me again.
  • Reliance Life Insurance Customer Care also assured me that except the lack of additional benefits committed by Rahul Jain, the policy sent to me is OK in all other aspects and I shall be benefited by all other things mentioned in the policy and therefore, I do not have to worry about my future benefits regarding this policy.  I was satisfied with their explanation and closed the subject at that time.
  • On 09.06.2014, I received a call from (011) 65498378, asking me whether I had any bad experience earlier regarding the Reliance Life Insurance Policy.  The caller said his name as Gaurav Chauhan and he further said that he was calling from Customer Relationship Department.  He said that the amount I had given to Mr. Rahul Jain was not credited to Reliance Life Insurance by him.  Instead Mr. Rahul Jain invested the full amount in the Mutual Funds.  Now the mutual fund is matured and the amount was claimed by Mr. Rahul Jain stating that the client (that means me – CHETAN SUBHASH GUGALE) is not interested in the amount.  He also told me that he will call again after some time.
  • Thereafter, Mr. Gaurav again called me. Now this time as I was alert, I started recording the conversation.  He told me that whether I am really interested or not in the matured amount of Rs.2,62,400/- (Rupees Two Lac Sixty Two Thousand Four Hundred Only).  If I was interested, I had to pay the ten percent of this amount i.e. Rs.26,240/- (Rupees Twenty Six Thousand Two Hundred and Forty Only) to him.  For this I had to write a cheque of this much amount in favour of ARCADE ENSURE and it is to be sent to Mr. Gaurav Chauhan, ARCADE ENSURE, Office No.166, First Floor, Wadhawa Complex, Near Laxmi Nagar Metro Station, Gate No.I, New Delhi 110092.
  • He also told to send the following items along with the cheque.
    • Photocopies of First and Last Page of the Reliance Life Insurance Policy.
    • Photocopies of  Address Proof (Voter Id / Driving Licence)
    • 2 Passport size Photographs.
    • Handwritten application with signature requesting the maturity amount of the mutual fund to Customer Relationship Manager.
  • He wanted everything mentioned above immediately and asked me to send this by courier and intimate him the courier consignment number by 14:00 Hrs. on 09.06.2014.
  • I said that I was unable to do all these things so fast as I was busy with other tasks.
  • Then he called me again and again on 09.06.2014 from (011) 65498378, (011) 65495507 and 07838549577.  During his total 16 conversations, every time he made slight changes in the plan and finally he told me to send a scanned copy of hand written and signed application for demanding the money along with Voter Id and PAN Card  on the electronic mail address Rajiv.V.Chouhan@Gmail.com and deposit the ten percent amount i.e. Rs.26,240/- (Rupees Twenty Six Thousand Two Hundred and Forty Only) in the Punjab national Bank account number 0635000103047320 of Mr. Umesh Sharma on or before 11:00 hrs. on 10.06.2014.  This account number and electronic mail address he informed me via SMS from mobile number 07838549577.  All his conversations (except the very first one) were recorded by me on my mobile phone.  He further assured me that as and when I credit Rs.26,240/- to said account I shall immediately get the maturity amount of the mutual funds.  The moneys is ready with him in the form of the following three cheques of Cosmos Co. Op. Bank Ltd. :-
    • Cheque No.000006 for Rs.2,00,000/-
    • Cheque No.000009 for Rs.62,400/-
    • Cheque No.000009 for Rs.90,000/-
It is clearly seen that this is a serious type of financial cheating done by so called Mr. Gaurav Chauhan.  He is just trying to get Rs.26,240/- (Rupees Twenty Six Thousand Two Hundred and Forty Only) from me and obviously he will never going to pay me any amount of matured mutual funds sum as he has committed. 
The main points in this case are to be noted as given below:
·        On 22.06.2013, when Mr. Rahul Jain called me he was from New Delhi and asked all the documents and cheque at New Delhi 110092.  Now Mr. Gaurav Chauhan also from New Delhi and he is also asking the documents and cheque at New Delhi 110092. 
·        In the case of Mr. Rahul Jain, Reliance Customer Care refused to take any responsibility of cheating done by him.  However, the mobile phone number 8459430046 used by Mr. Rahul Jain when checked with true-caller website found in the name of Reliance Insurance.
·        The cheating done by Mr. Rahul Jain with me regarding Reliance Life Insurance was known to me, Mr. Rahul Jain and Reliance Life Insurance Customer Care only.  Nobody out of this circle was known about this.
·        The Mobile Phone Number 07838549577 used by Mr. Gaurav Chauhan when checked with true-caller website found in the name of Plumber Umesh Shriram.
This must be a big racket of fraudulent people and may involve one or more employees from Reliance Life Insurance.  It needs to be investigated from the root and all these cheaters should be punished legally.
P.S.: I have all the written (Snap Shots of Electronic Mails and scanned documents) and recorded (sound files of recorded telephonic conversations) proofs which are strong enough to prove the fraud.   

All these evidences can be found here on internet through the link given below :-
 
CHETAN SUBHASH GUGALE
Plot # 86, Sector # 25, Nigdi,
Pimpri-Chinchwad New Town,
PUNE – 411044
(M) 9552077615

रिलायन्स आयूर्विमा फसवणूक

श्री. राहूल जैन व श्री. गौरव चौहान यांनी रिलायन्स आयुर्विम्याच्या खात्रीशीर परतावा योजनेबाबत माझ्याशी केलेल्या फसवणूकीचा तपशील.
  • २२.०६.२०१३ रोजी मला श्री. राहूल जैन (भ्रमणध्वनी क्रमांक  ८४५९४३००४६) यांनी संपर्क साधून रिलायन्स आयुर्विमा योजनेची माहिती दिली.  त्यांनी आपल्या rahuljain.reliance@gmail.com या ईमेल पत्त्याद्वारे माझ्याchetangugale@gmail.com या ईमेलपत्त्यावर ईमेलदेखील पाठविले ज्यासोबत त्यांनी रिलायन्स आयुर्विम्याच्या खात्रीशीर परतावा योजने च्या अर्जाच्या प्रती देखील पाठविल्या होत्या. सोबत मला खालील गोष्टी पाठविण्यास सांगितले.
    • ओळखपत्र,
    • निवासी पुरावा,
    • २ छायाचित्रे,
    • रिलायन्स लाईफ इन्शुरअन्स कंपनी लिमिटेड च्या नावे धनादेश
o    इसीएस करिता एक रद्द केलेला धनादेश.
वरील सर्व गोष्टी संपूर्ण भरलेल्या अर्जासह रिलायन्स लॊगिन  डिपार्टमेंट, यू-२०३, तिसरा मजला, विकास मार्ग, शकरपूर दिल्ली – ९२ य पत्त्यावर पाठविण्यास सांगितल्या.
·         २५.०६.२०१३ रोजी त्यांनी पुन्हा अजून एक ईमेल पाठवून कंपनीसोबत थेट व्यवहार करीत असल्याने दरवर्षी २०% कमिशन आणि ०.५ ग्रॆम सुवर्ण नाणे या अतिरिक्त लाभांविषयी सांगितले.
  • मी त्यामुळे त्यांना खालील गोष्टी पाठविल्या
o    आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती
§  आधार कार्ड (क्र.३४९५३४८५४५१५),
§  पॆन कार्ड (क्र. एएवायपीजी३२६६सी),
o    रिलायन्स लाईफ इन्शुअरन्स कंपनी लिमिटेड च्या नावे  रु.३०,०००/- (रुपये तीस हजार फक्त) रकमेचा धनादेश क्र.२८५९६६ (भारतीय स्टेट बॆंक खाते क्र.३२५५७०५४३३१दिनांक २४.०६.२०१३.
o    रद्द केलेला धनादेश क्र. २८५९६३ ((भारतीय स्टेट बॆंक खाते क्र.३२५५७०५४३३१इसीएस करिता
o    दोन छायाचित्रे
o    रिलायन्स आयुर्विमा खात्रीशीर परतावा योजनेचा संपूर्ण भरलेला अर्ज क्र. डी६४७१५९९.
  • ०९.०७.२०१३ रोजी श्री. राहूल जैन यांनी मला ईमेलद्वारे रू.३०,०००/- चा रिलायन्स आयुर्विमा हप्ता भरल्याची पावती क्र.ड्ब्लूसी००१९९८८४७३ दि.२८.०६.२०१३ पाठविली.
  • त्यापुढील आठवड्यातच मला स्पीड पोस्टाने पाठविण्यात आलेली एक पुस्तिका मिळाली ज्यात मी भरलेल्या अर्जाच्या स्कॆन केलेल्या प्रती होत्या. परंतु मी भरलेला अर्ज आणि स्कॆन केलेल्या प्रतींमध्ये फरक होता.  मी भरलेल्या अर्जाचा क्रमांक डी६४७१५९९ होता तर स्कॆन केलेल्या प्रतींवर डी५६९४६०१ हा क्रमांक होता. तसेच माझ्या ९५५२०७७६१५ या योग्य भ्रमणध्वनी क्रमांकाऐवजी ०८५०६९५८७६७ हा चूकीचा भ्रमणध्वनी क्रमांक देखील टाकला गेला होता.
  • मी त्वरीत श्री. राहूल जैन यांस संपर्क करून या चूकांविषयी कळविले.  याविषयी स्पष्टीकरण देताना श्री. जैन यांनी सांगितले की मी भरून पाठविलेला अर्ज स्पष्ट दिसत नसल्याने त्यांनी पुन्हा दुसरा अर्ज भरला.  तसेच यात वेगळा भ्रमणध्वनी क्रमांक नजरचूकीने टाकण्यात आला. त्यांनी असेही सांगितले की ही कागदपत्रे तात्पुरत्या स्वरुपाची असून शिक्क्यांसह पक्की कागदपत्रे काही दिवसांतच मला पाठविली जातील.
  • परंतु मला शिक्क्यांसह पक्की कागदपत्रे मिळालीच नाहीत.  म्हणून मी श्री राहूल जैन यांस २८.०७.२०१३, ०९.०९.२०१३ व १६.०९.२०३ रोजी पुन्हा पुन्हा ईमेल पाठवून याविषयी पाठपुरावा करीत राहिलो.  याशिवाय मी त्यांस भ्रमणध्वनीवर देखील संपर्क करीत राहिलो. परंतु मला त्यांचेकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.
  • यास्तव मी rlife.customerservice@relianceada.com वर २४.०९.२०१३ रोजी ईमेल करून सर्व हकीगत कळविली.  तसेच मी त्यांना श्री. राहूल जैन यांनी कबूल केलेल्या “कंपनीसोबत थेट व्यवहार करीत असल्याने दरवर्षी २०% कमिशन आणि ०.५ ग्रॆम सुवर्ण नाणे” या अतिरिक्त लाभांविषयी देखील विचारले.
  • त्यानंतर २५.०९.२०१३ रोजी मला त्यांचा खालीलप्रमाणे प्रतिसाद आला:
    आम्ही आपणास कळवू इच्छितो की, आमचे विक्री प्रतिनिधी आणि त्यांची कार्यालये संपूर्ण देशाच्या विविध भागात पसरलेली आहेत.  सध्या आम्ही या प्रकरणाचा तपास करीत आहोत आणि त्यावर योग्य ती कारवाई करू.  कृपया खात्री बाळगा की भविष्यात पुन्हा असा प्रसंग घडणार नाही.  तुम्हाला दलालाकडून कबूल करण्यात आल्याप्रमाणे कोणत्याही योजना रिलायन्स लाईफ इन्शुअरन्सकडून दिल्या जात नाहीत.   यास्तव अशा बनावट दूरध्वनी कॊल्सकडे आणि त्यांच्या वचनांकडे दुर्लक्ष करावे.”


  • मी रिलायन्स लाईफ इन्शुअरन्सच्या ग्राहक सेवा केंद्रास १८००३०००८१८१ या क्रमांकावर देखील संपर्क साधला.त्यांनी मला सांगितले की, जी कागदपत्रे मला मिळाली आहेत तीच पक्की असून शिक्क्यांसह अजून कुठलीही वेगळी कागदपत्रे मला पुन्हा पाठविली जाणार नाहीत.
  • रिलायन्स लाईफ इन्शुअरन्सच्या ग्राहक सेवा केंद्राने मला हेदेखील सांगितले  की श्री. राहूल जैन यांनी कबूल केलेल्या अतिरिक्त लाभांची हानी वगळता मला पाठविण्यात आलेली विमा पॊलिसी पूर्णत: योग्य असून त्यात व्यक्त केलेले इतर सर्व फायदे मला मिळतील तरी मी याबाबत निश्चिंत राहावे. यावर मी समाधान व्यक्त करीत हा विषय इथेच थांबविला.
  • ०९.६.२०१४ रोजी मला (०११)६५४९८३७८ या क्रमांकावरून एक दूरध्वनी आला आणि पूर्वी कधी रिलायन्स आयुर्विमा खरेदीचा मला वाईट अनुभव आला आहे का अशी विचारणा केली गेली. दूरध्वनीकर्त्याने स्वत:चे नाव गौरव चौहान असे सांगितले आणि त्याने हेदेखील सांगितले की तो ग्राहक संपर्क विभागातून बोलत आहे.  त्याने पुढे सांगितले की, मी श्री. राहूल जैन यांस दिलेली रक्कम त्याने रिलायन्सला दिलीच नसून म्युचूअल फंडात गुंतविली होती.  आता म्युचूअल फंड परिपक्व झाले असून ही फलित रक्कम घेण्यास ग्राहक (म्हणजे मी – चेतन सुभाष गुगळे) इच्छुक नसून त्या रकमेवर श्री. राहूल जैन यांनी दावा सांगितला आहे. एवढे बोलून श्री. गौरव चौहान यांनी मला सांगितले की ते पुन्हा काही वेळाने माझ्याशी संपर्क साधतील.
  • त्यानंतर काही वेळातच श्री. गौरव चौहान यांनी मला पुन्हा संपर्क केला.  यावेळी मी सावध असल्याने संभाषणाचे ध्वनिमुद्रण सुरू केले. त्यांनी मला पुन्हा विचारले की मी म्युचूअल फंडाची फलित रक्कम रु.२,६२,४००/- (रुपये दोन लाख बासष्ट हजार चारशे फक्त) घेण्यास खरोखरच इच्छूक नाहीये का? जर का मी ती रक्कम स्वीकारण्यास इच्छूक असेल तर मी या रकमेच्या दहा टक्के रकमेचा अर्थात रु.२६,२४०/- (रुपये सव्वीस हजार दोनशे चाळीस फक्त) चा धनादेश आर्केड एन्शुअर च्या नावे लिहून तो श्री. गौरव चौहान यांस आर्केड एन्शुअर, कार्यालय क्रमांक १६६, पहिला मजला, वाधवा संकूल, लक्ष्मीनगर मेट्रो स्थानकाजवळ, फाटक क्रमांक १, नवी दिल्ली – ११००९२ या पत्त्यावर पाठवावा.


  • श्री.गौरव चौहान यांनी खालील बाबीदेखील धनादेशासोबत पाठविण्यास सांगितल्या.
    • रिलायन्स आयुर्विमा पॊलिसीच्या पहिल्या व शेवटच्या पानाच्या छायाप्रती.
    • निवासी पत्त्याच्या छायाप्रती (निवडणूक ओळखपत्र / वाहन परवाना)
    • २ पासपोर्ट आकाराची छायाचित्रे.
    • ग्राहक संपर्क व्यवस्थापकाच्या नावे म्युचूअल फंडाच्या फलित रकमेची मागणी करणारा हस्तलिखित व स्वाक्षरीसह असलेला अर्ज
  • श्री. गौरव चौहान यांस या सर्व बाबी त्वरीत हव्या होत्या व त्यांनी मला त्या ०९.०६.२०१४ च्या १४:०० वाजण्यापूर्वी कुरिअर मध्ये देवून कुरिअरचा कन्साईन्मेन्ट क्रमांक कळविण्यास सांगितले.  
  • मी इतर कामांत व्यग्र असल्याने इतक्या त्वरीत हे सर्व करणे शक्य नसल्याचे कळविले.
  • त्यानंतर श्री. गौरव चौहान यांनी मला (०११)६५४९८३७८, (०११)६५४९५५०७ आणि ०७८३८५४९५७७ या क्रमांकांवरून ०९.०६.२०१४ रोजी पुन्हा पुन्हा संपर्क साधला.  एकूण १६ संभाषणांदरम्यान त्यांनी आपल्या योजनेत पुन्हापुन्हा बदल केला आणि अंतिमत: त्यांनी मला हस्तलिखित व स्वाक्षरी असलेल्या अर्जाची स्कॆन केलेली प्रत निवडणूक ओळखपत्र व पॆनकार्ड सह Rajiv.V.Chouhan@Gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठविण्यास सांगितले आणि १० टक्के रक्कम अर्थातरु.२६,२४०/- (रुपये सव्वीस हजार दोनशे चाळीस फक्त)   श्री. उमेश शर्मा यांच्या पंजाब नॆशनल बॆंकेतील खाते क्रमांक ०६३५०००१०३०४७३२० वर १०.०६.२०१४ रोजी ११:०० वाजण्यापूर्वी जमा करण्यास सांगितले.  हा खाते क्रमांक आणि ईमेल पत्ता त्यांनी मला आपल्या भ्रमणध्वनी क्रमांक ०७८३८५४९५७७ वरून एसेमेस करून पाठविला.  त्यांचे सर्व संभाषण (अगदी सुरुवातीचे पहिले संभाषण वगळता) मी माझ्या भ्रमणध्वनीवर मुद्रित करून ठेवलेले आहे.  श्री. गौरव शर्मा यांनी मला आश्वासित केले की मी रु.२६,२४०/- त्यांच्या सूचनेनुसार जमा केल्यावर लगेचच मला म्युचूअल फंडाची फलित रक्कम मिळेल. ही रक्कम त्यांचेपाशी कॊसमॊस बॆंकेच्या खालील धनादेशांच्या रुपात तयार आहे.
    • धनादेश क्रमांक ०००००६ रू.२,००,०००/-
    • धनादेश क्रमांक ०००००६ रू.६२,४००/-
    • धनादेश क्रमांक ०००००६ रू.९०,०००/-


हे उघड आणि स्पष्ट आहे की गौरव चौहान म्हणविल्या गेलेल्या तथाकथित व्यक्तिकडून केली जाणारी ही एक मोठ्या प्रकारातील आर्थिक फसवणूक आहे. तसेच हे देखील स्पष्टच आहे की त्यांस केवळ रू.२६,२४०/- (रुपये सव्वीस हजार दोनशे चाळीस फक्त) माझ्याकडून लुबाडायचे असून तो कबूल केल्यानुसार कुठलीही म्युचूअल फंडाची फलित रक्कम मला देणार नाहीये.
नोंद घेण्याजोगे ह्या प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे:-
·        २२.०६.२०१३ मला नवी दिल्ली येथून श्री. राहूल जैन या व्यक्तिने संपर्क साधला होता आणि सर्व कागदपत्रे नवी दिल्ली ११००९२ येथे मागविली होती.  आता श्री. गौरव जैन ही व्यक्तिही नवी दिल्लीहूनच संपर्क साधत असून कागदपत्रेही नवी दिल्ली ११००९२ येथेच मागवित आहे.
·        श्री. राहूल जैन यांचे प्रकरणात रिलायंस ग्राहक सेवा केन्द्राने त्यांनी केलेल्या फसवणूकीची जबाबदारी नाकारली होती.  परंतु, त्यांनी वापरलेला भ्रमणध्वनी क्रमांक ८४५९४३००४६ ट्रुकॊलर वेबसाईटवर तपासला असता रिलायन्स इन्शुअरन्सच्या नावावर आढळला.
·        श्री. राहूल जैन यांनी माझी केलेली फसवणूक केवळ मला, श्री. राहूल जैन आणि रिलायन्स आयुर्विमा ग्राहक सेवा केन्द्र यांनाच ठाऊक होती.  या वर्तूळाबाहेरच्या कुणालाही याविषयी काहीच कल्पना नव्हती.
·        श्री. गौरव चौहान यांनी वापरलेला भ्रमणध्वनी क्रमांक ०७८३८५४९५७७ ट्रूकॊलर च्या वेब साईटवर तपासला असता प्लंबर उमेश श्रीराम च्या नावावर आढळला.
हे नक्कीच घोटाळेबाज व्यक्तींकडून चालविले जाणारे मोठे षड्यंत्र असून त्यात रिलायंस इन्शुअरन्सचेही एक वा अनेक कर्मचारी सामिल असू शकतात. याचा मूळापासून तपास होऊन दोषींवर सक्त कायदेशीर कारवाई होण्याची गरज आहे.
माझ्यापाशी सर्व लेखी (ईमेल स्नॆपशोट्स आणि स्कॆन्ड कागदपत्रे) तसेच मुद्रित (भ्रमणध्वनी संभाषण) सबळ पुरावे असून ते दोषींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यास पुरेसे आहेत.
हे सर्व पुरावे खाली दिलेल्या दुव्याद्वारे आंतरजालावर पाहता येऊ शकतील:-
https://drive.google.com/folderview?id=0B9-2hmnBdOPQcmhYQ1RNcUE0aTQ&usp=sharing

चेतन सुभाष गुगळे
भूखंड क्रमांक ८६, पेठ क्रमांक २५,
पिंपरी-चिंचवड नवनगर, निगडी,
पुणे – ४११०४४
भ्रमणध्वनी ९५५२०७७६१५

Wednesday, December 29, 2010

नाण्याची दुसरी बाजू अर्थात Behind Every Crime There Is An Injustice

काही काळापूर्वी मी शालेय विद्यार्थ्यांची शिकवणी घेत होतो तेव्हाची गोष्ट.  माझ्याकडे येणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये सातवीत शिकणारा वरद नावाचा एक चुणचुणीत मुलगा होता.  तो अतिशय जिज्ञासू आणि अभ्यासू असल्याचे माझे निरीक्षण होते.  एकदा मात्र इतिहासाचा विषय निघाला असता तो अचानक काही कारणाने  उत्तेजित झाला.  इंग्रजांनी आपल्यावर अनन्वित अन्याय अत्याचार केले असून तिथे जाऊन आपणही त्यांचा तशाच प्रकारे बदला घेतला पाहिजे.  इंग्लंडमध्ये जाळपोळ करून तो देशच नष्ट केला पाहिजे वगैरे, वगैरे.  त्याला आधी मी शांत होण्यास सांगितले.  नंतर थोड्या वेळाने मी त्याला त्याचे विचार ऐकून मला कुठलाही धक्का बसला नसल्याचे सांगितले.  बर्‍याच वर्षांपूर्वी माझेही असेच काहीसे विचार होते परंतू ते कालांतराने पूर्णत: बदलले असल्याचेही सांगितले.  माझ्या विचारांमध्ये असे परिवर्तन नेमके कशामुळे घडून आले हे जाणण्यास वरद उत्सुक होता.  त्याला मी हा सारा घटनाक्रम थोडक्यात समजावून सांगितला तो अशा प्रकारे -

मी तिसरीला असताना आम्हाला शालेय अभ्यासक्रमात थोरांची ओळख हे पुस्तक इतिहास या विषयाकरिता होते.  या पुस्तकात दादाभाई नौरोजी, लाला लजपतराय, गोपाळ कृष्ण गोखले, जोतिबा फुले, बाळ गंगाधर टिळक, मोहनदास करमचंद गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल, चित्तरंजन बोस इत्यादी स्वातंत्र्यपूर्व काळातील नेत्यांची सचित्र माहिती नमूद केलेली होती.  बहुतेक पाठांमध्ये इंग्रजांनी भारतीयांवर केलेल्या जुलूम, अत्याचारांचे अंगावर शहारे आणणारे वर्णन होते.  विशेषत: लाला लजपतराय यांनी सायमन कमिशनचा काळे ध्वज दाखवून आणि सायमन गो बॅक अशा घोषणा देऊन निषेध केला होता तेव्हा त्यांना इंग्रजांनी छातीवर दंडुक्यांनी मारहाण केली, त्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा अंत झाला वगैरे वाचून तर मी फारच अस्वस्थ झालो.  तेव्हा रात्र रात्र मला झोप येत नसे.  इंग्लंड अतिशय क्रूर, दुष्ट लोकांचा देश आहे.  कुठल्याही प्रकारे त्या देशात घुसून तेथील वीजवाहक तारांना आगी लावून तो देश नष्ट केला पाहिजे (वीजवाहक तारांना आग लागल्यास ती आग  जिथे जिथे तारा पोचल्या आहेत अशा सर्व ठिकाणी फार वेगाने पसरते इतपत सामान्य ज्ञान मला त्या वयात होते) वगैरे विचारांनी मी अतिशय तळमळत असे.  एकतर असे काही करणे मला तेव्हा (आणि आजदेखील) अजिबात शक्य नव्हते. शिवाय हे असे स्फोटक (?) विचार कुणाला बोलून दाखवायची देखील सोय नव्हती.   त्यामुळे दिवसेंदिवस माझी बेचैनी वाढतच होती.

तशातच माझ्या एका मित्राची बहीण जी जळगावला राहत होती, काही कारणास्तव पुण्याला राहायला आली.  तीदेखील जळगावात तिसर्‍या इयत्तेतच शिकत होती.  अर्धे शैक्षणिक वर्ष जळगावच्या शाळेत व्यतीत केल्यावर तिने पुण्यातल्या शाळेत जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा आमच्या वर्गशिक्षिकेने (तेव्हा आम्हाला सर्व विषय शिकवायला एकच शिक्षिका होत्या) तिची इतर सर्व विषयांची पुस्तके बरोबर आहेत परंतू भूगोलाचे पुस्तक मात्र नव्याने विकत घ्यावे लागेल असे तिला सांगितले.  तिच्याजवळ असलेले भूगोलाचे पुस्तक न चालण्याचे नेमके कारण काय असावे या कुतूहलापोटी मी ते पुस्तक पाहू लागलो आणि आपल्याच जगात वावरणार्‍या त्या वयातल्या मला धक्काच बसला.  तिच्या भूगोलाच्या पुस्तकावर लिहिले होते आपला जळगाव जिल्हा.  आम्हा सर्वांच्या भूगोलाच्या पुस्तकावर लिहीले होते आपला पुणे जिल्हा.

विचारांचा धक्का विजेच्या धक्क्यापेक्षाही तीव्र असतो असे म्हणतात.  मलादेखील ह्या वैचारीक धक्क्याचा मोठा परिणाम जाणवला.  यानंतर माझी विचार करण्याची दिशाच बदलून गेली.  प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन अमूलाग्र बदलला.  म्हणजे कसे ते पाहा - जळगाव पुण्यापासून साधारण चारशे किमी लांब आहे.  पुण्यातले विद्यार्थी तिसरीच्या भूगोलात पुणे जिल्ह्याचा अभ्यास करतात तर जळगावचे विद्यार्थी जळगावचा.  चौथीत दोघांचा भूगोल समान असणार कदाचित कारण चौथीत महाराष्ट्राचा अभ्यास आहे पण तेव्हा दुसर्‍या राज्यात पुन्हा वेगळाच भूगोल असणार.  पाचवीत तोदेखील समान असेल कारण संपूर्ण भारताचा तेव्हा भूगोलाच्या अभ्यासात समावेश आहे पण दुसर्‍या देशाचे विद्यार्थी त्यांच्याच देशाचा अभ्यास करतील.  पुढे जेव्हा वरच्या इयत्तेत जगाचा भूगोल शिकविला जाईल तेव्हा कदाचित सर्व जगातल्या विद्यार्थ्यांचा भूगोल समान असूही शकेल पण मग इतिहासाचे काय?

प्रत्येक देश / प्रांत /  राज्य विद्यार्थ्यांना स्वत:चा इतिहास शिकवतील पण आंतरराष्ट्रीय इतिहास शिकवायची वेळ येईल तेव्हा ते सार्‍या गोष्टी स्पष्टपणे मांडू शकतील काय? शंकाच आहे.  इंग्लंडच्या विद्यार्थ्यांना इतिहासात असे शिकविले जाईल का की आपण भारतावर राज्य केले, त्या देशाला गुलामगिरीत जखडले, तेथील जनतेवर अन्याय, अत्याचार, जुलूम जोर जबरदस्ती केली वगैरे, वगैरे.  अर्थातच अशी कोणतीही शक्यता नाही.  उलट तिथल्या विद्यार्थ्यांना अशी माहिती पुरविली जात असणार की भारत हा एक अति मागासलेला देश होता.  त्यास इंग्लंडच्या राज्यकर्त्यांनी नवीन तंत्रज्ञान, लोकशाही वगैरे बाबी शिकवून एक विकसनशील देश म्हणून उभे केले व त्या बदल्यात भारताच्या जनतेने कृतघ्नपणे इंग्रज अधिकार्‍यांना हाकलून लावले इत्यादी, इत्यादी.  म्हणजेच आपण म्हणणार की ते चूकीचा इतिहास शिकवित आहेत.  मग कशावरून आज आपण आपल्या विद्यार्थ्यांना जो इतिहास शिकवित आहोत तो खरा आहे? शंभर टक्के प्रामाणिक आहे?

त्यानंतर मी कुठल्याही गोष्टीकडे फारसे उत्तेजित न होता पाह्यचे ठरविले.  ह्याचे कारण आपणांस जी माहिती प्रथम पुरविली जाते, कालांतराने त्याच्या अगदी उलट माहिती तितक्याच ठामपणे आपल्या समोर येते.  उदाहरणार्थ, मोहनदास करमचंद गांधींविषयी शालेय जीवनात अगदी पाचवीपर्यंत मला अतिशय छान, आदर वाटावा अशी माहिती अभ्यासातून, इतर व्याख्यानातून मिळत होती पण पाचवीत मी गोपाळ गोडसेंचे पंचावन्न कोटींचे बळी हे पुस्तक वाचले.  ह्या पुस्तकात गांधींविषयी माझ्या पूर्वीच्या माहितीला छेद देणारी अतिशय वेगळीच माहिती वाचनात आली.  यानंतर पुढे अनेक ठिकाणी गांधींविषयी उलट सुलट लिहिलेले आढळले.  नेमका कशावर विश्वास ठेवायचा?

पुढे मी सातवीत असताना बाळासाहेब भारदे यांचे व्याख्यान ऐकले.  ते म्हणाले, "तुम्ही भारताचे नागरीक आहात काय?  भारताचा नागरीक असणे म्हणजे पाकिस्तानचा द्वेष करणे असे जर तुम्हाला वाटत असेल तर माझे तुम्हाला कळकळीचे सांगणे आहे की तुम्ही भारताचे नागरीक होऊ नका.  विश्वाचे नागरीक व्हा.  तुम्हाला तुमच्या पूर्वजांनी शिकविलेला सर्वच इतिहास खरा असेलच असे नाही.  शेजारी राहणार्‍या दोन कुटुंबांमध्ये भांडणे असतील तर प्रत्येक कुटुंबातले आईवडील त्यांच्या मुलांना आपण कसे बरोबर आहोत आणि आपल्या शेजारचे कसे चूक आहेत हेच शिकवित राहणार.  आता यात खरे काय आणि खोटे काय?  वस्तुस्थिती माहित नसणारी त्या कुटुंबातली मुले तेच वैर पुढे वाढवित राहणार.  शेजारी असणार्‍या दोन राष्ट्रांबाबतही अशीच परिस्थिती आहे.  तुम्ही नव्या पिढीचे प्रतिनिधी आहात.  पुर्वग्रहदूषित विचारसरणी बाळगून शत्रूभाव जपण्यापेक्षा खुल्या मनाने विचार करा.  भूतकाळात कोणाची चूक होती हे शोधण्याचा प्रयत्न करू नका.  कदाचित खरे काय ते तुम्हाला कधीच कळणार नाही.  दोन्ही बाजूचे आपापल्या परीने आपण सांगतोय तेच सत्य असे भासवायचा प्रयत्न करतील.  तेव्हा भूतकाळात कदाचित आपल्याही पूर्वजांकडून काही चूका झाल्या असण्याची शक्यता आहे हे समजून घ्या.  नव्याने संबंध प्रस्थापित करा तरच भविष्यात शांततेने जगणे शक्य होईल."  भारदेंच्या भाषणाने माझा ह्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन अधिकच व्यापक झाला.

याच दरम्यान हिंदू व मुस्लीम यांच्यात वैर कसे सुरू झाले ह्याविषयीची एक कथा माझ्या वाचनात आली ज्यामुळे आक्रमक धार्मिक युद्धांच्या मागची कारणे काय असू शकतील हे मला उमजले.  ती कथा थोडक्यात अशी - 

तर ही तेव्हाची गोष्ट आहे, जेव्हा हिंदु व मुस्लिम धर्मात वैर नव्हते. हिंदुंच्या राज्यात मुस्लिम व मुस्लिमांच्या राज्यात हिंदु राहत होते. असाच एक हिंदु मनुष्य मुस्लिम राजवटीच्या प्रदेशात राहत होता. कष्ट करून पोट भरणारा तो एक अतिसामान्य तरूण होता.
तो त्याच्या कामानिमित्त राजवाड्यासमोरील रस्त्यावरून जात असताना राजकन्या त्याला सज्जातून पाहत असे. असे पाहणे अनेकदा झाल्यावर तिला असे जाणवले की तिला तो आवडू लागला आहे. तिने आपल्या वडिलांना म्हणजेच त्या प्रदेशाच्या राजाला आपण त्या तरूणाशी विवाह करण्याची इच्छा बाळगून असल्याचे सांगितले.
राजाने अर्थातच या गोष्टीला संमती दिली नाही कारण हा तरूण एक सामान्य नागरीक होता. (धर्माचा मुद्दा राजाने मांडला नाही कारण राजाला त्याचा धर्मच माहित नव्हता. परंतू रस्त्यावरून पायी चालत जाणारा म्हणजे सामान्य व आपल्या तोलामोलाचा नक्कीच नाही हे त्याला सहज कळले)

परंतू काही दिवसातच राजाच्या लक्षात आले की राजकन्येने त्या तरूणाचा ध्यास घेतला आहे व तिचे सदर तरूणाशी लग्न लावले नाही तर ती सदैव दु:ख करीत राहील. शेवटी राजा एकदाचा तयार झाला. नाहीतरी त्याला ती एकुलती एक कन्या होती. तिच्या सुखाकरिता एवढी तडजोड करायला तो तयार झाला. त्याने सेवकांना सांगून त्या तरूणास बोलावून घेतले.
त्या तरूणाला राजाने राजकन्येची इच्छा बोलून दाखविली व तिच्या इच्छेप्रमाणे तिच्याशी विवाह करण्यास सांगितले.
त्या तरूणाला एवढे ठाऊक होते की या राजाचा आणि आपला धर्म एक नाही. त्याने या प्रस्तावास स्पष्ट नकार दिला. राजाला हा सरळ सरळ स्वत:चा अपमान वाटला. त्याचप्रमाणे राजकन्या कष्टी होईल याचीही कल्पना आली.
राजाने त्या तरूणाला ’राजकन्येशी विवाह कर’ असा हुकूम दिला अन्यथा सेवकांकरवी त्याचे प्राण घेण्याची धमकी दिली.
ही धमकी ऐकताच इतका वेळ आतल्या दालनात असलेली राजकन्या धावत दरबारात आली व तिने राजाला सांगितले की या तरूणावर कोणतीही जबरद्स्ती करू नये तो स्वेच्छेने तयार असेल तरच हा विवाह आयोजित करावा.

राजकन्येने दरबारात प्रवेश केला तसे एकदम चित्रच पालटले. मुख्य म्हणजे त्या तरूणाने तोपर्यंत कधी राजकन्येला पाहिलेच नव्हते. त्यामुळे राजकन्येचे प्रेम तसे पाहता एकतर्फीच होते. परंतु राजकन्येला त्याने दरबारात त्यावेळी पाहिले आणि तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून तो ही तिच्या प्रेमातच पडला. आता काहीही करून हिच्याशी आपले लग्न झालेच पाहिजे असे त्यालाही वाटून गेले.
मग त्याने आपला लग्नासाठी आधी व्यक्त केलेला ठाम नकार रद्द करीत ’राजकन्या जर हिंदु धर्मात यायला तयार असेल तर मी लग्न करीन’ असा सशर्त होकार दिला.
राजाने ह्या अटीला संमती दिली. मग तो तरूण त्या राजकन्येला घेऊन स्थानिक हिंदु पंडिताकडे गेला. त्या पंडिताने राजकन्या म्लेंच्छ असल्याने तिला शुद्ध करून घ्यावे लागेल असे सांगितले. सदर शुद्धीकरण करण्यासाठी यज्ञाचे आयोजन व त्याकरिता आहुती / दक्षिणा आदींची मोठी मागणी केली. ती अर्थातच पुरविण्यात आली. त्यानंतर अनेक धार्मिक विधी / पुजा अर्चा करण्यात आल्या. या सगळ्या नंतर ही पुन्हा मोठे ग्रंथ / पोथ्या चाळून संदर्भ शोधण्यात आले आणि स्थानिक पातळीवर त्या राजकन्येचे शुद्धीकरण शक्य नसून तिला यापेक्षा मोठ्या धर्मपीठा समोर जाण्यास सांगण्यात आले.

 पुन्हा एक पातळी वर च्या धर्मपीठात ही याच गोष्टींची पुनरावृत्ती घडली. फक्त यावेळी आहुती / दक्षिणा यांच्या मागणीत वाढ झाली. शिवाय धर्मग्रंथ / पोथ्या यांच्या वाचनाकरिता पंडितांची संख्या जास्त होती त्यामुळे अर्थातच वेळही जास्त खर्च झाला. पण निष्कर्ष शेवटी तोच. राजकन्या शुद्ध होऊ शकत नाही
(जरा आठवून पाहिल्यास आपल्या असे लक्षात येईल -  ज्ञानेश्वरादी भावंडे - संन्याशाची मुले म्हणून अशुद्ध घोषित करण्यात आली व पुढे त्यांना शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत अशाच काही गोष्टी घडल्या होत्या. असो.) 

 असे करता करता शेवटी सर्वोच्च अशा काशीक्षेत्री तो तरूण त्या राजकन्येला घेऊन पोचला. सदर वाटचाली दरम्यान ती राजकन्या त्या तरूणाची मनोभावे सेवा करीत होती या सर्व काळात त्याला तिच्यातील सौंदर्याशिवाय असण्यार्‍या इतर गुणांमुळेही ती अतिशय आवडू लागली. तिच्याशिवायआपण जगू शकणार नाही याची ही त्याला खात्री झालीच. काशीक्षेत्री काय फैसला होणार याचा अंदाज त्या तरूणाला आलाच होता. अर्थात अपेक्षेप्रमाणे तिथे देखील नकार घंटाच वाजली.
त्यानंतर ती राजकन्या व तो तरूण पुन्हा राज्यात आले व राजाला सर्व वृत्तांत कथन केला. राजा व राजकन्या या दोघांनी ही परिस्थिती पुढे नमते घेत विवाहाचा नाद सोडून दिला व त्या तरूणास निरोप देण्याची तयारी केली.

स्त्रिच्या प्रेमात मूलत:च एक त्यागाची भावना असते. त्यामुळे आपणाला आपले प्रेम मिळत नसल्यास त्या ते वास्तव चटकन स्वीकारतात. याउलट पुरूषांची लालसा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यांचे प्रेम हे ’हक्कप्रधान’ असते. ते मागणी करीत राहते.
इथे ही असेच घडले. तो तरूण च आता राजकन्येच्या प्रेमात पडला होता. रिकाम्या हातांनी परतणे त्याला शक्यच नव्हते. त्याने सरळ राजाला विचारले, " ही हिंदु होऊ शकत नसली तरी काय झाले? मी मुसलमान व्हायला तयार आहे. तुम्ही मला तुमच्या धर्मात घेऊ शकाल काय?"
राजाने ह्या गोष्टीला अत्यंत आनंदाने होकार दिला. मुस्लीम धर्मात प्रवेश करणे अतिशय सुलभ असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे मग तो तरूण मुस्लीम बनला आणि त्याने राजकन्येशी विवाह केला. त्यांचा संसार अतिशय सुखाचा झाला.
कालांतराने राजाने त्याचे राज्य आपल्या जावयाच्या सुपूर्त केले. आता हा नवीन राजा म्हणजे आपला कथानायक पुर्वाश्रमीचा हिंदु तरूण.. आणि याच्या प्रेमकहाणीतील त्यावेळचे खलनायक कोण तर हिंदुच्या धर्मपीठातील धर्म मार्तंड व तथाकथित आधिकारी व्यक्ति ... ज्यांनी आहुती / दक्षिणा वसूल करण्याखेरीज कुठलीही सश्रध्द क्रिया न करता आपल्या अधिकारात एका परधर्मीय निष्पाप तरूणीला हिंदू धर्मात येण्यास विनाकारण रोखून धरले होते.
तेव्हा या नवीन राजाने राज्यावर येताच आपल्या सैनिकांना हुकुम सोडला ....
"हिंदूंची देवळे तोडा.. लुटा... तेथील धर्मरक्षकांची कत्तल करा..."
त्यांनतर त्याने त्याच्या वारसांनाही हीच शिकवण दिली. आणि यानंतरच हिंद आणि मुसलमान या दोन धर्मात वैर सुरू झाले.
बाटगा जास्त कडवा असतो ही म्हण ही या घटनेनंतरच उदयास आली.
(कथा समाप्त)



सदर कथा मी रचलेली / लिहिलेली नाही. कोणाच्या भावना यामुळे दुखावल्यास मी जबाबदार नाही. त्याचप्रमाणे ही कथा कुठल्याही मुसलमान अथवा अन्य धर्मीय व्यक्तिने सांगितली नसून स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर यांनीच त्यांच्या एका भाषणात सांगितली होती.
सदर भाषणाचा वृत्तांत व ही कथा ’शतपैलू सावरकर’ (लेखक - ह. त्र्यं. देसाई) या पुस्तकात वाचण्यास मिळेल. ही कथा ज्या काळात घडली त्या काळात मी जन्मलो नसल्याने तिच्या सत्य / असत्यते विषयी मी काहीच भाष्य करू शकत नाही परंतू ती कथा त्या पुस्तकात असल्याचे व मी शाळेत असताना ती वाचल्याचे मला आठवते.


हे सर्व स्पष्टीकरण ऐकल्यावर वरदच्या विचारांमध्ये बराच फरक पडला. 

Tuesday, October 26, 2010

आणि धर्मराज युधिष्ठिरानेही अधर्माचीच साथ दिली

२००९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांमध्ये कॊंग्रेसने मिळविलेल्या यशाला पंतप्रधानांनी केलेले मतदारांचे ब्लॆकमेलिंग कारणीभूत?




अंतर्गत लाथाळ्यांनी त्रस्त झालेल्या कॊंग्रेस - राष्ट्रवादी कॊंग्रेसला आपण पुन्हा निवडून येऊ शकू का ही चिंता सतावत होती पण ऒक्टोबर २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये महाराष्ट्रात या आघाडीत गेल्या वीस वर्षात मिळाल्या नाहीत इतक्या भरघोस जागा मिळविल्या आणि पुढच्या पाच वर्षांकरिता एका अतिशय स्थिर सरकारची स्थापना झाली पण   त्यांच्या यशामागचे रहस्य तसे दुर्लक्षितच राहिले. 

नेहमीप्रमाणेच यावेळीही प्रचारात अनेक नेत्यांनी सवंगपणाची पातळी ओलांडली.  जे नेते कायमच असे बोलतात त्यांची उदाहरणे मी पुन्हा देणार नाहीय पण ज्यांच्याकडून अधिक समंजसपणाची अपेक्षा होती त्या माननीय पंतप्रधान श्री. मनमोहन सिंगांनीही असे बेजबाबदार वक्तव्य करावे म्हणजे कळस झाला.  सतरा पोलिसांचे बळी घेणार्‍या नक्षलवाद्यांवर लष्करी कारवाई करणार नाही.  विकासाची गंगा त्यांच्या दारी न पोचल्याने परिस्थितीमुळेच ते नक्षलवादी झाले आहेत.  असे वक्तव्य करून पंतप्रधानांना नेमके काय सूचित करायचे होते?  ज्यांच्यावर अन्याय झालाय अशा सार्‍यांनीच शस्त्रे हाती घ्यावीत का, म्हणजे सरकार त्यांच्यावर कारवाई न करता चर्चेला तयार होईल?  शिवाय नक्षलवाद्यांशी एकांड्या शिलेदाराप्रमाणे लढणार्‍या पोलिसांच्या मनोधैर्याचे काय?  पुढे जाऊन पंतप्रधान असेही म्हणाले की जर राज्यात पुन्हा कॊंग्रेसचे सरकार आले तर केन्द्राकडून राज्याला भरघोस मदत दिली जाईल.  (वाचा लोकसत्ता दि. १२ ऒक्टोबर २००९ च्या अंकातील मुखपृष्ठावरील बातमी)  म्हणजे मतदारांनी दुसर्‍या पक्षाला मत देऊन सत्तेवर बसविले असते तर केन्द्र सरकार महाराष्ट्राची कोंडी करणार होते असाच अर्थ या विधानातून निघत नाही का?  आचारसंहिता किंवा कायद्याचा मुद्दा बाजुला ठेवला तरी हे राज्यातील जनतेचे ब्लॆकमेलिंग करणारे विधान नैतिकतेच्या कसोटीवर तरी टिकणारे होते काय?

अर्थात १३ ऒक्टोंबर २००९ ला झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये पंतप्रधानांच्या या वक्तव्याने आपली जादु दाखवलीच आणि कॊंग्रेस आघाडी पुन्हा एकदा जोमाने राज्यात सत्तेवर आली.

Thursday, October 14, 2010

चीनी अखबार ने भारतीय सेना का मजाक उड़ाया


नई दिल्ली ( एनबीटी ) : चीन की कम्युनिस्ट पार्टी से सम्बद्ध अखबार ' ग्लोबल टाइम्स ' ने भारतीय सेना पर अप्रिय टिप्पणियां की हैं। एक तरफ तो भारतीय सेना को ' एशिया में सर्वाधिक सक्रिय ' बताकर इशारे से कहा गया है कि भारत के इरादे आक्रामक हैं और दूसरी तरफ इसे बुजदिल बताया गया है क्योंकि भारतीय सैनिकों को ' युद्धबंदी बनने में शर्म नहीं आती। ' हालांकि ' ग्लोबल टाइम्स ' ने 1962 में भारत पर चीन के हमले का सीधा जिक्र नहीं किया है , मगर इशारा बहुत साफ है। गौरतलब है , 1962 में चीन ने भारतीय सैनिकों को युद्धबंदी बना लिया था , जिनमें ब्रिगेडियर रैंक तक के अधिकारी थे।

आम तौर से बुद्धिजीवियों और विद्वानों द्वारा पढ़े जाने वाले अखबार ' ग्लोबल टाइम्स ' ने लिखा कि बेशक भारतीय सेना आज एशिया में सर्वाधिक सक्रिय सेना है , जिसने ताजिकिस्तान में सैनिकों की कथित तैनाती कर रखी है , अफ्रीका में निगरानी स्टेशन कायम किए हैं और बंगाल की खाड़ी में अभ्यास के लिए विमान वाहक भेज रही है। भारतीय सेना लगभग रोज कोई न कोई सैनिक खबर बनाती है , लेकिन बाहरी दुनिया इस बारे में बहुत कम जानती है।

' ग्लोबल टाइम्स ' ने आगे लिखा है कि भारतीय सेना के पास बहुत आधुनिक हथियार हैं , लेकिन उसके सैनिक लड़ने से पहले ईश्वर की प्रार्थना करते हैं। भारतीय सैनिकों की संख्या करीब 13 लाख है , लेकिन शहरों में कोई सैनिक वर्दी में दिखाई नहीं पड़ता। भारतीय सेना का मिलाजुला स्वरूप है लेकिन विभिन्न धर्मों के सैनिक जब मिलते हैं तो एक दूसरे को घूर कर देखते हैं। अगर भारतीय समाज दुनिया में सबसे ज्यादा सुसंस्कृत है तो बेशक भारतीय सेना भी सबसे ज्यादा सुसंस्कृत है।

' ग्लोबल टाइम्स ' ने किन्हीं तीन जवानों से अपनी बातचीत का जिक्र भी किया। ' एक सैनिक ने मुझे बताया कि भर्ती के समय उससे दो कोबरा सांपों को पकड़ने के लिए कहा गया। उसने कारण पूछा तो बताया गया कि बहादुरी की परीक्षा होनी है , जानते हुए भी यह बहुत खतरनाक है , उसने कोबरा पकड़ा। एक अन्य सैनिक ने बताया कि सेना में शामिल होने के लिए उसके पिता को भर्ती अधिकारी के घर पर तीन महीने बेगार करनी पड़ी। तीसरे ने बताया कि अपनी छोटी बहन की इज्जत की कीमत पर वह सेना में भर्ती हो पाया। '

हालांकि खुद चीन की सेना में बड़ी संख्या में बूढ़े - बूढ़े जनरल और मार्शल हैं , फिर भी ' ग्लोबल टाइम्स ' ने लिखा कि भारतीय सेना में बड़ी संख्या बूढ़ों की है , जिनकी दाढ़ी बढ़ी रहती है। सेना में लंबे समय तक रहने के बाद वे महसूस करते हैं कि वे पैसे और अपने परिवार की आजीविका के लिए नौकरी कर रहे हैं। इसलिए वे लस्टम - पस्टम रहते हैं।

किसी भी फौज के लिए जो सबसे ज्यादा अपमानजनक शब्द हो सकते हैं , उनका प्रयोग करते हुए ' ग्लोबल टाइम्स ' ने लिखा कि भारतीय सेना में प्रचलित व्यवहार यह है कि अपने अफसर के आगे तो बहादुरी दिखाओ लेकिन वास्तव में ऐसा करो मत। अगर युद्धबंदी बना लिए जाओ तो उसमें कोई शर्म की बात नहीं। जब तक आपकी जान बचती है और आप सही सलामत घर पहुंच जाते हैं और पैसा मिलता रहता है , तब तक सब ठीक है। जब तक आप जीवित हैं , आप अपने परिवार को चलाने और अच्छी जिंदगी के लिए पैसा बनाते रह सकते हैं। अंत में ' ग्लोबल टाइम्स ' ने टिप्पणी की कि आप भारतीय सेना को जितनी गहराई से देखते हैं उतना ही महसूस करेंगे कि भारतीय सेना भारतीय समाज की तरह जटिल और समझ से परे है।


Friday, October 8, 2010

धर्माच्या नावाचे ब्रॆन्डींग, पण फक्त सोयीचे असेल तिथेच...

जैन धर्म हा जगात आणि भारतात देखील अत्यल्पसंख्य असलेला आणि तरी देखील मोठ्या प्रमाणात आपला प्रभाव टिकवून असलेला ब्रॆंड आहे. होय हा ब्रॆंड आहे असे मी म्हणतोय कारण मी हॊटेलात मेनूकार्ड वर जैन पावभाजी पाहतो. जैन पिझ्झा देखील सर्वांना परिचयाचा असेलच. पण मी कधी बौद्ध, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि हिंदू असे शब्द मागे लावलेल्या नावांचे पदार्थ अजून पाहिलेले नाहीत. त्याचप्रमाणे जैन धर्मीयांमध्ये अनेक व्यक्ती आपले आडनाव जैन असे लावतात. हा प्रकार देखील मी इतर ठिकाणी पाहिलेला नाही म्हणजे मंहमद मुस्लीम, रमेश हिंदू, अशोक बौद्ध किंवा डेव्हीड ख्रिश्चन मी अजून पाहिले नाहीत. पण राजीव जैन, राकेश जैन, महावीर जैन, अशोक जैन असे अनेक जैन बांधव माझ्या परिचयाचे आहेत. त्याचप्रमाणे अनेक मोठ्या उद्योगांना नाव देतेवेळी जैन शब्दाचा प्रकर्षाने वापर केला गेला आहे - जसे की, जैन टीवी, जैन इरिगेशन, इत्यादी. हिंदू ह्या वर्तमानपत्राचा अपवाद वगळता मला जैनेतर कुठल्याही धर्माचा कुठल्या ही उद्योगाकरिता फारसा वापर केल्याचे आढळलेले नाही.

जैनांनी आपल्या धर्माला (म्हणजे फक्त जैन या शब्दाला) अशा प्रकारे आपल्या रोजच्या व्यवहारातील पदार्थांना, स्वत:च्या नावाला, उद्योगाच्या नावाला जोडून त्याचा उच्चार जास्तीत जास्त वेळा कानावर पडेल अशी व्यवस्था करून ठेवलीय. डिसेंबर १९९९ ते फेब्रुवारी २००० दरम्यान मी बिहार मधील एका अतिशय प्रसिद्ध अशा जैन धर्मीयांच्या सामाजिक संस्थेत दोन महिने काम केले होते, त्यावेळी माझ्या पाहण्यात असे आले की तिथल्या जैन साध्वी वेगळ्या प्रकारची पादत्राणे वापरतात (ज्यात प्राण्यांच्या कातडीचा वापर केला गेला नाही). त्याचप्रमाणे त्या काळी वापरात असलेला रोल फिल्मचा कॆमेरा त्यांना चालत नसे. त्यांचे फोटो काढण्यासाठी डीजीटल कॆमेराच वापरला जावा असा त्यांचा आग्रह असे (तेव्हा डीजीटल कॆमेरा अतिशय महाग - साधारणत: रू.५०,०००/- च्या आसपास होता). रोल फिल्म ला प्राण्यांपासून मिळविलेले जिलेटीन लावलेले असते असे त्यांचे म्हणणे होते.

अशा प्रकारे आपल्या धर्मातील तत्वांचे अनुसरण करण्यात हा धर्म अतिशय काटेकोर असल्याचे इतरही अनेक प्रसंगी दिसून येते. उदाहरणार्थ, मांसाहारी व्यक्तिंना आपल्या वसाहतीत जागा न देणे, महावीर जयंतीच्या दिवशी कत्तलखाने बंद ठेवण्याचा आग्रह धरणे, तसेच हा अथवा इतर कोणताही जैन सण व मुस्लिमांची बकरी ईद एकाच दिवशी आल्यास मुस्लिमांना त्यांचा सणात केला जाणारा बकर्‍याच्या आहूतीचा विधी पुढे ढकलण्याची प्रेमळ सक्ती करणे. (खरे तर हे सायकल ने ट्रक ला "मला वाट देण्याकरिता बाजूला हो" असे सांगितल्या सारखे वाटते. गंमत म्हणजे मुस्लिम बांधव ही जैनांची ही सूचना विनातक्रार मान्य करतात.)

आता या सगळ्या गोष्टींमुळे जैन धर्माची तत्त्वे या समाजात अगदी खोलवर रुजली आहेत असा भास होतो. पण यातला फोलपणा जाणवून देणार्‍या काही गोष्टी मला इथे मांडाव्याशा वाटतात.

१. परवाच वीसीडीवर २०१० चा अतियशस्वी चित्रपट राजनीती पाहत होतो. चित्रपट जास्त कंटाळवाणा होता की त्यात ठराविक अंतराने सतत त्रस्त करणार्‍या अल कबीर च्या जाहिराती जास्त कंटाळवाण्या होत्या हे काही मी ठरवू शकलो नाही. या अल कबीर ला इतके वर्ष जाहिरातीची फारशी गरज कधी पडली नव्हती आणि तरी देखील हा आशियातला सर्वात मोठा कत्तलखाना आहे. या कत्तलखान्याच्या भागीदारांपैकी सर्वात मोठा भागीदार हा जैन धर्मीय आहे. (संदर्भ: http://visfot.com/index.php/jan_jeevan/477.html). म्हणजे जैनांच्या नेहमीच्या सवयीनुसार या कत्तलखान्याच्या नावात जैन शब्द असायला हवा होता पण ते गैरसोयीचे असल्याने तसे केले गेलेले नाही.

२. पुण्यातील आकुर्डी येथे एक जैन स्थानक (जैन धर्मीयांचे प्रार्थना स्थळ) आहे. या स्थानकाच्या १०० मीटर परिसरात एक परमीट रूम उघडण्यात आले आहे. धार्मिक स्थळाच्या १०० मीटर परिसरात मद्य विकण्यास कायद्याने परवानगी नाही तरीही असे राजरोसपणे चालु आहे कारण या स्थानकाच्या विश्वस्तांपैकीच एक जण हा त्या परमीट रूमचा देखील भागीदार आहे. यावर कडी म्हणजे या परमीट रूमला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा स्थानिक नगरसेवक मुस्लिम धर्मीय आहे.

या दोन अतिशय प्रातिनिधिक घटना आहे. अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत आणि अजूनही घडत आहेत. माझा मुख्य आक्षेप असा आहे की, जैन बांधव आपल्या धार्मिक तत्त्वांचे जिथे तिथे गोडवे गात फिरत असतात. इतरांनाही अहिंसा, सदाचार व शाकाहाराचा संदेश देतात (ज्याविषयी माझी काहीच हरकत नाही), पण मग त्यांनी वरील दोन घटनांचा तीव्र विरोध व जाहीर निषेध का केला नाहीय? जैन लोकांचे प्रसारमाध्यमात व समाजाच्या इतर क्षेत्रांमध्येही लक्षणीय प्राबल्य आहे; त्याचा उपयोग करून ते मनात आणले तर आपल्या बांधवांकडून घडणार्‍या अशा गोष्टी निश्चितच थांबवू शकतात.

मला हे ठाऊक आहे की प्रत्येक धर्माच्या लोकांपैकी काही जण अशा प्रकारे चूकीचे आचरण करत असतील पण जेव्हा आपण परधर्मीयांच्या अशा आचरणाचा निषेध करतो तेव्हा प्रथम स्वधर्माच्या लोकांकडून असे काही घडत नाहीयना याची खात्री करून घ्यायला हवी आणि तसे घडत असेल तर प्रथम आपण आपल्या वाट चुकलेल्या बांधवांचा निषेध केला पाहिजे जसा की मी स्वत: एक जैन धर्मीय या नात्याने या ब्लॊगवर करीत आहे.