Tuesday, October 26, 2010

आणि धर्मराज युधिष्ठिरानेही अधर्माचीच साथ दिली

२००९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांमध्ये कॊंग्रेसने मिळविलेल्या यशाला पंतप्रधानांनी केलेले मतदारांचे ब्लॆकमेलिंग कारणीभूत?




अंतर्गत लाथाळ्यांनी त्रस्त झालेल्या कॊंग्रेस - राष्ट्रवादी कॊंग्रेसला आपण पुन्हा निवडून येऊ शकू का ही चिंता सतावत होती पण ऒक्टोबर २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये महाराष्ट्रात या आघाडीत गेल्या वीस वर्षात मिळाल्या नाहीत इतक्या भरघोस जागा मिळविल्या आणि पुढच्या पाच वर्षांकरिता एका अतिशय स्थिर सरकारची स्थापना झाली पण   त्यांच्या यशामागचे रहस्य तसे दुर्लक्षितच राहिले. 

नेहमीप्रमाणेच यावेळीही प्रचारात अनेक नेत्यांनी सवंगपणाची पातळी ओलांडली.  जे नेते कायमच असे बोलतात त्यांची उदाहरणे मी पुन्हा देणार नाहीय पण ज्यांच्याकडून अधिक समंजसपणाची अपेक्षा होती त्या माननीय पंतप्रधान श्री. मनमोहन सिंगांनीही असे बेजबाबदार वक्तव्य करावे म्हणजे कळस झाला.  सतरा पोलिसांचे बळी घेणार्‍या नक्षलवाद्यांवर लष्करी कारवाई करणार नाही.  विकासाची गंगा त्यांच्या दारी न पोचल्याने परिस्थितीमुळेच ते नक्षलवादी झाले आहेत.  असे वक्तव्य करून पंतप्रधानांना नेमके काय सूचित करायचे होते?  ज्यांच्यावर अन्याय झालाय अशा सार्‍यांनीच शस्त्रे हाती घ्यावीत का, म्हणजे सरकार त्यांच्यावर कारवाई न करता चर्चेला तयार होईल?  शिवाय नक्षलवाद्यांशी एकांड्या शिलेदाराप्रमाणे लढणार्‍या पोलिसांच्या मनोधैर्याचे काय?  पुढे जाऊन पंतप्रधान असेही म्हणाले की जर राज्यात पुन्हा कॊंग्रेसचे सरकार आले तर केन्द्राकडून राज्याला भरघोस मदत दिली जाईल.  (वाचा लोकसत्ता दि. १२ ऒक्टोबर २००९ च्या अंकातील मुखपृष्ठावरील बातमी)  म्हणजे मतदारांनी दुसर्‍या पक्षाला मत देऊन सत्तेवर बसविले असते तर केन्द्र सरकार महाराष्ट्राची कोंडी करणार होते असाच अर्थ या विधानातून निघत नाही का?  आचारसंहिता किंवा कायद्याचा मुद्दा बाजुला ठेवला तरी हे राज्यातील जनतेचे ब्लॆकमेलिंग करणारे विधान नैतिकतेच्या कसोटीवर तरी टिकणारे होते काय?

अर्थात १३ ऒक्टोंबर २००९ ला झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये पंतप्रधानांच्या या वक्तव्याने आपली जादु दाखवलीच आणि कॊंग्रेस आघाडी पुन्हा एकदा जोमाने राज्यात सत्तेवर आली.

Thursday, October 14, 2010

चीनी अखबार ने भारतीय सेना का मजाक उड़ाया


नई दिल्ली ( एनबीटी ) : चीन की कम्युनिस्ट पार्टी से सम्बद्ध अखबार ' ग्लोबल टाइम्स ' ने भारतीय सेना पर अप्रिय टिप्पणियां की हैं। एक तरफ तो भारतीय सेना को ' एशिया में सर्वाधिक सक्रिय ' बताकर इशारे से कहा गया है कि भारत के इरादे आक्रामक हैं और दूसरी तरफ इसे बुजदिल बताया गया है क्योंकि भारतीय सैनिकों को ' युद्धबंदी बनने में शर्म नहीं आती। ' हालांकि ' ग्लोबल टाइम्स ' ने 1962 में भारत पर चीन के हमले का सीधा जिक्र नहीं किया है , मगर इशारा बहुत साफ है। गौरतलब है , 1962 में चीन ने भारतीय सैनिकों को युद्धबंदी बना लिया था , जिनमें ब्रिगेडियर रैंक तक के अधिकारी थे।

आम तौर से बुद्धिजीवियों और विद्वानों द्वारा पढ़े जाने वाले अखबार ' ग्लोबल टाइम्स ' ने लिखा कि बेशक भारतीय सेना आज एशिया में सर्वाधिक सक्रिय सेना है , जिसने ताजिकिस्तान में सैनिकों की कथित तैनाती कर रखी है , अफ्रीका में निगरानी स्टेशन कायम किए हैं और बंगाल की खाड़ी में अभ्यास के लिए विमान वाहक भेज रही है। भारतीय सेना लगभग रोज कोई न कोई सैनिक खबर बनाती है , लेकिन बाहरी दुनिया इस बारे में बहुत कम जानती है।

' ग्लोबल टाइम्स ' ने आगे लिखा है कि भारतीय सेना के पास बहुत आधुनिक हथियार हैं , लेकिन उसके सैनिक लड़ने से पहले ईश्वर की प्रार्थना करते हैं। भारतीय सैनिकों की संख्या करीब 13 लाख है , लेकिन शहरों में कोई सैनिक वर्दी में दिखाई नहीं पड़ता। भारतीय सेना का मिलाजुला स्वरूप है लेकिन विभिन्न धर्मों के सैनिक जब मिलते हैं तो एक दूसरे को घूर कर देखते हैं। अगर भारतीय समाज दुनिया में सबसे ज्यादा सुसंस्कृत है तो बेशक भारतीय सेना भी सबसे ज्यादा सुसंस्कृत है।

' ग्लोबल टाइम्स ' ने किन्हीं तीन जवानों से अपनी बातचीत का जिक्र भी किया। ' एक सैनिक ने मुझे बताया कि भर्ती के समय उससे दो कोबरा सांपों को पकड़ने के लिए कहा गया। उसने कारण पूछा तो बताया गया कि बहादुरी की परीक्षा होनी है , जानते हुए भी यह बहुत खतरनाक है , उसने कोबरा पकड़ा। एक अन्य सैनिक ने बताया कि सेना में शामिल होने के लिए उसके पिता को भर्ती अधिकारी के घर पर तीन महीने बेगार करनी पड़ी। तीसरे ने बताया कि अपनी छोटी बहन की इज्जत की कीमत पर वह सेना में भर्ती हो पाया। '

हालांकि खुद चीन की सेना में बड़ी संख्या में बूढ़े - बूढ़े जनरल और मार्शल हैं , फिर भी ' ग्लोबल टाइम्स ' ने लिखा कि भारतीय सेना में बड़ी संख्या बूढ़ों की है , जिनकी दाढ़ी बढ़ी रहती है। सेना में लंबे समय तक रहने के बाद वे महसूस करते हैं कि वे पैसे और अपने परिवार की आजीविका के लिए नौकरी कर रहे हैं। इसलिए वे लस्टम - पस्टम रहते हैं।

किसी भी फौज के लिए जो सबसे ज्यादा अपमानजनक शब्द हो सकते हैं , उनका प्रयोग करते हुए ' ग्लोबल टाइम्स ' ने लिखा कि भारतीय सेना में प्रचलित व्यवहार यह है कि अपने अफसर के आगे तो बहादुरी दिखाओ लेकिन वास्तव में ऐसा करो मत। अगर युद्धबंदी बना लिए जाओ तो उसमें कोई शर्म की बात नहीं। जब तक आपकी जान बचती है और आप सही सलामत घर पहुंच जाते हैं और पैसा मिलता रहता है , तब तक सब ठीक है। जब तक आप जीवित हैं , आप अपने परिवार को चलाने और अच्छी जिंदगी के लिए पैसा बनाते रह सकते हैं। अंत में ' ग्लोबल टाइम्स ' ने टिप्पणी की कि आप भारतीय सेना को जितनी गहराई से देखते हैं उतना ही महसूस करेंगे कि भारतीय सेना भारतीय समाज की तरह जटिल और समझ से परे है।


Friday, October 8, 2010

धर्माच्या नावाचे ब्रॆन्डींग, पण फक्त सोयीचे असेल तिथेच...

जैन धर्म हा जगात आणि भारतात देखील अत्यल्पसंख्य असलेला आणि तरी देखील मोठ्या प्रमाणात आपला प्रभाव टिकवून असलेला ब्रॆंड आहे. होय हा ब्रॆंड आहे असे मी म्हणतोय कारण मी हॊटेलात मेनूकार्ड वर जैन पावभाजी पाहतो. जैन पिझ्झा देखील सर्वांना परिचयाचा असेलच. पण मी कधी बौद्ध, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि हिंदू असे शब्द मागे लावलेल्या नावांचे पदार्थ अजून पाहिलेले नाहीत. त्याचप्रमाणे जैन धर्मीयांमध्ये अनेक व्यक्ती आपले आडनाव जैन असे लावतात. हा प्रकार देखील मी इतर ठिकाणी पाहिलेला नाही म्हणजे मंहमद मुस्लीम, रमेश हिंदू, अशोक बौद्ध किंवा डेव्हीड ख्रिश्चन मी अजून पाहिले नाहीत. पण राजीव जैन, राकेश जैन, महावीर जैन, अशोक जैन असे अनेक जैन बांधव माझ्या परिचयाचे आहेत. त्याचप्रमाणे अनेक मोठ्या उद्योगांना नाव देतेवेळी जैन शब्दाचा प्रकर्षाने वापर केला गेला आहे - जसे की, जैन टीवी, जैन इरिगेशन, इत्यादी. हिंदू ह्या वर्तमानपत्राचा अपवाद वगळता मला जैनेतर कुठल्याही धर्माचा कुठल्या ही उद्योगाकरिता फारसा वापर केल्याचे आढळलेले नाही.

जैनांनी आपल्या धर्माला (म्हणजे फक्त जैन या शब्दाला) अशा प्रकारे आपल्या रोजच्या व्यवहारातील पदार्थांना, स्वत:च्या नावाला, उद्योगाच्या नावाला जोडून त्याचा उच्चार जास्तीत जास्त वेळा कानावर पडेल अशी व्यवस्था करून ठेवलीय. डिसेंबर १९९९ ते फेब्रुवारी २००० दरम्यान मी बिहार मधील एका अतिशय प्रसिद्ध अशा जैन धर्मीयांच्या सामाजिक संस्थेत दोन महिने काम केले होते, त्यावेळी माझ्या पाहण्यात असे आले की तिथल्या जैन साध्वी वेगळ्या प्रकारची पादत्राणे वापरतात (ज्यात प्राण्यांच्या कातडीचा वापर केला गेला नाही). त्याचप्रमाणे त्या काळी वापरात असलेला रोल फिल्मचा कॆमेरा त्यांना चालत नसे. त्यांचे फोटो काढण्यासाठी डीजीटल कॆमेराच वापरला जावा असा त्यांचा आग्रह असे (तेव्हा डीजीटल कॆमेरा अतिशय महाग - साधारणत: रू.५०,०००/- च्या आसपास होता). रोल फिल्म ला प्राण्यांपासून मिळविलेले जिलेटीन लावलेले असते असे त्यांचे म्हणणे होते.

अशा प्रकारे आपल्या धर्मातील तत्वांचे अनुसरण करण्यात हा धर्म अतिशय काटेकोर असल्याचे इतरही अनेक प्रसंगी दिसून येते. उदाहरणार्थ, मांसाहारी व्यक्तिंना आपल्या वसाहतीत जागा न देणे, महावीर जयंतीच्या दिवशी कत्तलखाने बंद ठेवण्याचा आग्रह धरणे, तसेच हा अथवा इतर कोणताही जैन सण व मुस्लिमांची बकरी ईद एकाच दिवशी आल्यास मुस्लिमांना त्यांचा सणात केला जाणारा बकर्‍याच्या आहूतीचा विधी पुढे ढकलण्याची प्रेमळ सक्ती करणे. (खरे तर हे सायकल ने ट्रक ला "मला वाट देण्याकरिता बाजूला हो" असे सांगितल्या सारखे वाटते. गंमत म्हणजे मुस्लिम बांधव ही जैनांची ही सूचना विनातक्रार मान्य करतात.)

आता या सगळ्या गोष्टींमुळे जैन धर्माची तत्त्वे या समाजात अगदी खोलवर रुजली आहेत असा भास होतो. पण यातला फोलपणा जाणवून देणार्‍या काही गोष्टी मला इथे मांडाव्याशा वाटतात.

१. परवाच वीसीडीवर २०१० चा अतियशस्वी चित्रपट राजनीती पाहत होतो. चित्रपट जास्त कंटाळवाणा होता की त्यात ठराविक अंतराने सतत त्रस्त करणार्‍या अल कबीर च्या जाहिराती जास्त कंटाळवाण्या होत्या हे काही मी ठरवू शकलो नाही. या अल कबीर ला इतके वर्ष जाहिरातीची फारशी गरज कधी पडली नव्हती आणि तरी देखील हा आशियातला सर्वात मोठा कत्तलखाना आहे. या कत्तलखान्याच्या भागीदारांपैकी सर्वात मोठा भागीदार हा जैन धर्मीय आहे. (संदर्भ: http://visfot.com/index.php/jan_jeevan/477.html). म्हणजे जैनांच्या नेहमीच्या सवयीनुसार या कत्तलखान्याच्या नावात जैन शब्द असायला हवा होता पण ते गैरसोयीचे असल्याने तसे केले गेलेले नाही.

२. पुण्यातील आकुर्डी येथे एक जैन स्थानक (जैन धर्मीयांचे प्रार्थना स्थळ) आहे. या स्थानकाच्या १०० मीटर परिसरात एक परमीट रूम उघडण्यात आले आहे. धार्मिक स्थळाच्या १०० मीटर परिसरात मद्य विकण्यास कायद्याने परवानगी नाही तरीही असे राजरोसपणे चालु आहे कारण या स्थानकाच्या विश्वस्तांपैकीच एक जण हा त्या परमीट रूमचा देखील भागीदार आहे. यावर कडी म्हणजे या परमीट रूमला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा स्थानिक नगरसेवक मुस्लिम धर्मीय आहे.

या दोन अतिशय प्रातिनिधिक घटना आहे. अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत आणि अजूनही घडत आहेत. माझा मुख्य आक्षेप असा आहे की, जैन बांधव आपल्या धार्मिक तत्त्वांचे जिथे तिथे गोडवे गात फिरत असतात. इतरांनाही अहिंसा, सदाचार व शाकाहाराचा संदेश देतात (ज्याविषयी माझी काहीच हरकत नाही), पण मग त्यांनी वरील दोन घटनांचा तीव्र विरोध व जाहीर निषेध का केला नाहीय? जैन लोकांचे प्रसारमाध्यमात व समाजाच्या इतर क्षेत्रांमध्येही लक्षणीय प्राबल्य आहे; त्याचा उपयोग करून ते मनात आणले तर आपल्या बांधवांकडून घडणार्‍या अशा गोष्टी निश्चितच थांबवू शकतात.

मला हे ठाऊक आहे की प्रत्येक धर्माच्या लोकांपैकी काही जण अशा प्रकारे चूकीचे आचरण करत असतील पण जेव्हा आपण परधर्मीयांच्या अशा आचरणाचा निषेध करतो तेव्हा प्रथम स्वधर्माच्या लोकांकडून असे काही घडत नाहीयना याची खात्री करून घ्यायला हवी आणि तसे घडत असेल तर प्रथम आपण आपल्या वाट चुकलेल्या बांधवांचा निषेध केला पाहिजे जसा की मी स्वत: एक जैन धर्मीय या नात्याने या ब्लॊगवर करीत आहे.

Thursday, October 7, 2010

धर्मादाय रूग्णालय उभारणार्‍या दानशुराचा काळाकुट्ट इतिहास

बंड वरून आम्ही चालत होतो ते ’पीस’ हॊटेलच्या दिशेनं. जुन्या जमान्यात सर्वाधिक गाजलेलं हे हॊटेल अजून उभं आहे. अजून सुप्रसिद्ध आहे. याचं पूर्वीचं नाव ’कॆथे हॊटेल’. व्हिक्टर ससून या प्रख्यात भारतीय ज्यूनं हे १९३० मध्ये बांधलं.

ससून कुटुंब मूळचं बगदादी ज्यू, पण अनेक पिढ्यांपूर्वी ते भारतात येऊन राहिलं. ब्रिटिशांना अफूच्या व्यापारात मदत करून अपरंपार श्रीमंत झालं. ब्रिटिश राजघराण्यानं व्हिक्टर ससूनला ’सर’ हा किताब दिला होता.

भारतीय स्वातंत्र्ययुद्ध जोरात पेटल्यावर सुरक्षिततेसाठी भारत सोडून तो शांघायला गेला. तिथं त्यानं आपली सारी धनदौलत जमीन-जुमल्यात आणि शर्यतीच्या घोड्यांत ओतली. या शहरात त्याच्या एकूण एकोणीसशे इमारती होत्या. त्यांचा मुकुटमणी ’ससून हाउस’ म्हणजेच त्याचं ’कॆथे होटेल’.

मुंबईला उतरावं तर ’ताज’ मधे, सिंगापूरला ’रॆफेल’ मधे, हॊंगकॊंगला ’पेनिन्सुला’ मधे, तसं शांघायला या ’कॆथे हॊटेल’ मधे असं उच्च वर्तूळात म्हटलं जायचं. त्याचा हिरव्या पिरॆमिडसारखा कळस कुठूनही दिसतो. सर्वात वरच्या बाराव्या मजल्यावर ससूनचं ऒफिस आणि पेंट हाउस होतं. तिथून तो आपल्या जंगी इस्टेटीची देखभाल करी.

हा धनत्तर ससून अतिशय हौशी आणि रंगेल गुलछबू होता. विमान अपघातात दोन्ही पाय निकामी झालेल्या या गृहस्थानं शांघाय गाजवलं. त्याच्या थाटामाटाच्या पार्ट्या, खाने, गाणी-बजावणी, भेटवस्तू, घोड्यांच्या शर्यती आणि लफडीकुलंगडी शांघायमध्ये सर्वांत अधिक चघळली जात. पार्टीला आलेल्या हजारभर पाहुण्यांना भेट म्हणून त्यानं एकदा सोन्याची घड्याळं दिली होती.

दौलतीची ही चढती कमान कम्युनिस्ट राजवट आल्यावर कोसळली. त्यांनी ससूनची सारी जायदाद हिसकावून घेतली. जिथं देशोदेशींचे राजदूत संचार करत असत त्या कॆथेमध्ये हजारो कम्युनिस्ट सैनिक गाडगी-मडकी, सरपण, भाजीपाला, कपड्यांची बोचकी खेचरावर लादून आले. बंदूक हाती दिलेले शेतमजूर ते. असलं वैभव कधी स्वप्नात न पाहिलेलं. त्यांनी घातलेला धुमाकूळ अजब होता. कुणी तास न् तास लिफ्टनं खाली-वर करत. कुणी छपरी पलंगावर उड्या मारत. कुणी संडासच्या कुंडीमध्ये तांदूळ धूत. कुणी आपली खेचरं आतल्या बारला बांधून टाकली. उंची गालिचा लिदीखाली सडला.

सरकारनं हिसकावून घेतलेलं हे हॊटेल १९५३ मधे ससूननं कागदोपत्री सरकारला बहाल केलं. अधिकार्‍यांकडून मोठ्या मिनतवारीनं देशाबाहेर जाण्याचा परवाना मिळवला आणि शांघायमधून पळ काढला. तो म्हणायचा, ’मी भारत सोडला पण चीननं मला सोडलं!’

पुण्याच्या ससून रूग्णालयात मेडिकल कॊलेजची पाच वर्षं काढलेली असल्यानं जुन्या आठवणींचे लोट आले. इतक्या दूरच्या ठिकाणी इतक्या जवळचं नाव असं आकस्मात भेटत होतं, त्याचा आनंद झाला. पण ज्या ससून कुटुंबानं दक्षिण महाराष्ट्रातल्या लाखो रूग्णांची सोय केली, त्याची दया दुसर्‍या एका देशाला व्यसनाच्या खाईत लोटून कमावलेल्या पैशावर बेतलेली होती, हे उमगून मन विषण्ण झालं. ’ठेव म्हणून ठेवलेल्या जमिनी विश्वस्तांनीच लाटून, त्यांच्यावर इंग्लिश बॆरिस्टरांच्या जगाला कायदा शिकवणार्‍या ’इन्स ऒफ द कोर्ट’ या संस्था पूर्ण बेकायदेशीरपणे उभारल्या’ हे सत्य समजल्यावर झालं होतं तसं.

पुढे अनेक वर्षांनी ’पीस हॊटेल’ या नावानं ससूनच्या कॆथे हॊटेलचं पुनरूज्जीवन झालं. पूर्वीसारखं सजवून ते पर्यटकांसाठी उघडलं गेलं. तिथं जाऊन कमीतकमी चहा तरी पिऊन यावं असा माझा मनोदय होता.

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हॊटेल पसरलेलं. उजव्या हाताच्या इमारतीत मुख्य प्रवेशद्वार होतं. गेल्या शतकाच्या प्रारंभीच्या ’निओ-क्लासिकल’ शैलीतली सहा मजली देखणी इमारत. तिच्या दुधी आणि शेवाळी रंगसंगतींवर सोनेरी वेलबुट्टी झळकत होती. त्याच रंगांच्या गणवेषातल्या दरवानानं आदबीनं वाकून स्वागत केलं आणि आत पाचारण केलं.

आतली सजावट तशीच भारदस्त. किंचित अंधार्‍या स्वागत-कक्षात भरगच्च झुंबरं, जाड गालिचे, चमकतं जॊर्जिअन फर्निचर आणि जाड मखमली पडदे होते. हॊंगकॊंगमधल्या चायना-क्लबसारखं पुन्हा एखाद्या इंग्लिश-क्लबमधे शिरल्यासारखं वाटलं.

सुंदर कोरीव जिना. वरच्या मजल्यावर चहापानाची व्यवस्था होती. तिथं जाऊन जुन्या आरामखुर्च्यांमधे सैलावून बसलो. संत्र्याचा रस आणि इथली ’खासियत’ म्हणून सेवकानंच सुचवलेला क्लब सॆंडविच मागवला आणि सभोवती पाहायला लागलो.

नोएल कॊवर्ड गळपट्टा सावरीत आता तिकडून येईलसं वाटलं. येईल सुद्धा! ’प्रायव्हेट लाईफ’ हे त्याचं गाजलेलं नाटक इथंच लिहिलं गेलं होतं. आतल्या खोलीत, लेखकांच्या गराड्यात सॊमरसेत मॊम ’रेझर्स एज’ वाचून दाखवत असेल, की ग्रॆऎम ग्रीनचे खास मित्र त्याला नव्या रहस्यकथेचा प्लॊट सांगायचा आग्रह करत असतील?

पूर्वी सजावट, भोजन आणि मदनमस्त खेळ यांनी वेगळं वलय बहाल केलेलं हे आगळंवेगळं हॊटेल आज जुनाट, मंद आणि किंचित केविलवाणंच वाटत होतं. कर्जबाजारी वतनदारानं आपला पुरातन वाडा कसाबसा तगवून धरल्यासारखं. लठ्ठ चिरूट ओढणारे दोन अमेरिकन, त्यांच्या जाडजूड बायका आणि घसा खरवडत बोलणारे जर्मन. आम्ही वगळता कुतूहलानं जमलेली एवढीच पर्यटक मंडळी आता इथं हजर होती.

मागवलेला खास पदार्थही काही खास नव्हता. तेव्हा दोन ऒरेंज ज्यूसचे ३५० रूपये टिच्चून ’एवढ्या पैशात मुंबईला उडप्याकडे चार जण जेवलो असतो’ असं हळहळत बाहेर आलो. त्या भिकार क्लब-सॆंडविचचे पैसे देण्याचं मात्र आम्ही नाकारलं.

चीनी माती (लेखिका - मीना प्रभू)